समाजातील 'या' वर्गाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे...
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या भारत देशातील प्रत्येत नागरिकासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये अर्थमंत्र्यांनी गरीब जनतेला प्राधान्य देत त्यांच्यासाठी अतीव महत्त्वाच्या घोषणा करत अन्नधान्य पुरवठा आणि वित्तीय तुटवड्याची झळ या वर्गाला बसणार नाही याची काळजी घेतली. नोकरदार वर्गासाठीही सीतारमण यांनी काही तरतुदी जाहीर केल्या.
देशभरातील जनतेसाठी तब्बल १ लाख ७० हजार कोटी रुपयांची मोठी रक्कम विविध योजनांअंतर्गत या संघर्षाच्या काळात देशहितासाठी वापरण्यात येणार आहे.
अर्थमंत्र्यांच्या काही महत्त्वाच्या घोषणा खालीलप्रमाणे-
-केंद्र सरकारकडून गरिबांसाठी १ लाख ७० हजार कोटी रुपयांचं पॅकेज. कष्टकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा.
-प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची घोषणा
-आरोग्य सेवेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला ५० लाखांचा आरोग्य विमा. २० लाख कर्मचाऱ्यांना मिळणार इंशुरन्सची सेवा
-प्रत्येक गरिबाला ३ महिने ५ किलो अन्नधान्य मोफत. गरिबांच्या खात्यात थेट पैसे जाणार. अर्थमंत्र्यांची घोषणा
-शेतकऱ्यांना महिना २ हजार रुपयांची मदत
-मनरेगाच्या ५ कोटी मजुरांना योजनेचा लाभ


0 Comments